Sunday, December 26, 2010

Dr.A.H.Salunkhe's Shivray: Sanskar Ani Shikshan Published...

आ.ह.साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण" ( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले परमानंदकृत "शिवभारत" ह्या अस्सल साधनाच्या आधारे शिवरायांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर जिजाऊ आणि शहाजीराजे ह्यांच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा प्रभाव त्यांना छत्रपती पदापर्यंत घेवून गेला.. साळुंखे सरांनी ह्याचा धावता आढावा शिवभारताच्या आधारे घेतला आहे... आ.ह.साळुंखे ह्यांचे हे शिवचरित्रावरील पहिलेच पुस्तक असल्याने चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा आहेत..

Dr.A.H.Salunkhe's Shivray: Sanskar Ani Shikshan Published...

Monday, May 10, 2010

शासनाने मराठा इतिहास संशोधन अकादमी स्थापन करावी



शासनाने मराठा इतिहास संशोधन अकादमी स्थापन करावी
(10-05-2010 : 1:22:04)

पुणे, दि. ९ (प्रतिनिधी) : मराठ्यांच्या खराखुरा इतिहास समोर आणण्यासाठी राज्य शासनाने जागतिक दर्जाच्या मराठा इतिहास संशोधन अकादमीची स्थापना करावी असा ठराव पहिल्या मराठा इतिहास परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला.पहिल्या मराठा इतिहास परिषदेच्या समारोप प्रसंगी ११ ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष विकास पासलकर, नगरसेवक चेतन तुपे, वैजयंतीमाला पासलकर, संयोजक राहुल पोकळे, इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.समारोप कार्यक्रमामध्ये मुबंई येथील अरबी समुद्रातील जागतिक शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवावा, शिवछत्रपतींच्या सर्व किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, औरंगाबाद विमानतळास राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे, पुण्यामध्ये महत्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करावे, लहुजी वस्ताव साळवे यांच्या नावाने क्रिडा पुरस्कार देण्यात यावा असे ठराव मंजूर करण्यात आले. श्रीमंत कोकाटे यांनी ठरावांचे वाचन केले.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खेडेकर म्हणाले, '' समोरासमोरच्या लढाया लढणे अशक्य असल्याने लेखणीव्दारे इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. मराठी, इंग्रजी, हिन्दी या भाषांबरोबरच इतर परकीय भाषांचा अभ्यास करून त्या भाषांमध्ये लिहल्या गेलेल्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून खरा इतिहास समोर येण्यास मदत होईल.''फुले अकादमीचे कार्यालय उभारावेमहात्मा फुले यांना इतिहास संशोधक म्हणूनही मान्यता काही लोकांनी दिली नाही. त्या महात्मा फुले यांच्या नावाने फुले इतिहास अकादमीची सुरूवात केली जात आहे ही आनंदाची बाब आहे. इतिहास संशोधनामध्ये भरीव कामगिरी करण्याची जबाबदारी फुले इतिहास अकादमीस पार पाडायची आहे. त्याचे हायटेक कार्यालय पुण्यात उभारावे अशी सूचना खेडेकर यांनी केली. तसेच त्याकरीता १ लाख रूपयांचा निधी मराठा सेवा संघाच्या वतीने देत असल्याची घोषणा केली.


Sunday, May 9, 2010

Maratha Itihas Parishad, Pune




हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले

हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले
(09-05-2010 : 2:24:29)

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वत:च्या हितसंबंधाच्या कक्षेतून माणूस इतिहासाकडे वळतो, त्यातून त्या त्या काळाचा अजेंडा म्हणून इतिहासाची निर्मिती, पुनर्निर्मिती होत जाते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे लिखाणही अशाप्रकारेच झाल्याचे मत डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने आयोजित पहिल्या मराठा इतिहास परिषदेतील 'शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह' या परिसंवादामध्ये ते बोलत होते. डॉ. उमेश कदम, डॉ. अनिल शिगारे यांनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.शिवाजीमहाराजांच्या इतिहास लेखनाचे सध्या तीन प्रवाह दिसून येत असल्याचे स्पष्ट करून ढमाले म्हणाले, ''ब्राम्हणेतर चळवळीतून पुढे आलेला प्रवाह, कॉ. शरद पाटील यांनी विकसित केलेला जातिव्यवस्था व स्त्री दास्यमुक्तीचा प्रवाह, डॉ. सदानंद मोरे यांचे वारकरी प्रारूप, अशा तीन प्रकारे शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे लेखन केले जात आहे. ब्राह्यणेतर चळवळ पुढे नेणाऱ्या मराठा सेवा संघाने शिवाजी महाराजांची गोब्राह्यण प्रतिपालक ही ओळख पुसून कुळवाडी भूषण ही ओळख पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज यांनी जमिनी नसलेल्या जाती- जमातींना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना त्या जाती-जमातींमध्ये निर्माण झाल्याचे कॉ. शरद पाटील यांनी मत मांडले आहे. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांना अग्रभागी ठेवून इतिहासाची मांडणी केली आहे.''महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण हा पोवाडा लिहिला होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे रूपांतर पुढील काळामध्ये ब्राह्यमणेतर चळवळीमध्ये झाले. शिवाजीमहाराज व रामदास स्वामी यांची भेट १६७२ मध्ये झाली तोपर्यंत स्वराज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणता येणार नाही. शिवकालीन इतिहासाचा वापर स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये केला गेला. या चळवळीचे शिवाजी महाराज प्रतीक बनले होते, असे ढमाले यांनी सांगितले.
इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका
(09-05-2010 : 2:36:14)
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.

दिवस पहिला :--

सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्‌घाटन :- फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते.

दुपारी बारा वाजता :- "शिवकाळचे इतिहास लेखन'

दुपारी अडीच वाजता :- "शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह'

सायंकाळी पावणेपाच वाजता :- "शिव इतिहास व विविध माध्यमे चित्रण, चिकित्सा'

रात्री ७वजत :- "अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास'

रात्री नऊ वाजता :- कोल्हापूरच्या कागल येथील शिवराज्य मंचतर्फे "छत्रपती शिवाजी महाराज' हे नाटक सादर केले जाणार आहे.

दिवस दुसरा

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता :- "शिवकर्तृत्वाचे विविध पैलू' आणि "शिवकाळाचे इतिहास लेखन'

दुपारी एक वाजता :-- "शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा-दिग्दर्शन'

दुपारी अडीच वाजता :- "शिवकालीन विस्थापितांचा दुर्लक्षित इतिहास'

सायंकाळी पावणेपाच वाजता :- "इतिहास लेखकांकडून अपेक्षा'

Tuesday, April 27, 2010

पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यात
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:00 AM (IST)

सोलापूर - महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी आयोजित पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक भवन येथे 8 व 9 मेरोजी होणार असल्याचे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी कळविले आहे.रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी इतिहास व धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. अशोक राणा असणार आहेत. राहूल पोकळे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर असणार आहेत.आठ मेरोजी पहिल्या सत्रात शिवकाळाचे इतिहास लेखन : पध्दतीशास्त्र आणि सिध्दांत या विषयावर ऍड. अनंत दारवटकर, रोहिणी कोडितकर वक्‍ते बोलणार असून, प्रा. देवेंद्र इंगळे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह या विषयावर प्रा. डॉ. उमेश कदम, प्र्रा सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर ढमाले बोलणार असून, डॉ. अनिल शिनगारे अध्यक्ष असणार आहेत. तिसऱ्या सत्रात शिव इतिहास व विविध माध्यमे : चित्रण या विषयावर गंगाधर बनबरे, मदन पाटील, इंद्रजित सावंत बोलणार असून, डॉ. शरणकुमार निंबाळे अध्यक्षस्थानी आहेत. चौथ्या सत्रात अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास या विषयावर प्रा. डॉ. उमेश बगाडे आणि कागल येथील शिवराज्य मंचचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजीमहाराज हे नाटक सादर करणार आहेत.9 मेरोजी सकाळच्या सत्रात शिवकर्तृत्वाचे विविध पैलू , शिवकाळाचे इतिहास लेखन : लेखकांचे योगदान या दोन विषयावर शोधनिबंध वाचन होणार आहे. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा दिग्दर्शन या विषयावर ऍड. गाझीयोद्दिन सय्यद, प्रा. डॉ. निरज साळुंखे, प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे बोलणार असून, डॉ. पी.ए. गवळी अध्यक्षस्थानी आहेत. तिसऱ्या सत्रात शिवकालीन विस्थापितांचा इतिहास या विषयावर जयपाल चव्हाण, डॉ. एस.सी. गंगवार, डॉ. रोशनलाल गंगवार बोलणार आहेत. चौथ्या सत्रात इतिहास लेखकाकडून अपेक्षा या विषयावर राहूल पोकळे, रविंद्र माळवदकर बोलणार असून, प्रभाकर ढगे अध्यक्षस्थानी आहेत.समारोप सत्रात दिपक मानकर, चेतन तुपे, दिगंबर दुर्गाडे, अनिल जगताप उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राजाभाऊ पासलकर, दत्ता नलावडे, राम पायगुडे, प्रमोद मांडे यांचा विशेष सत्कार होणार आहे. सर्वांनी इतिहास परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. कोकाटे यांनी केले आहे


पुणे में पहली मराठा इतिहास परिषद
SATURDAY, 17 APRIL 2010 14:02
आगामी ८ व ९ मई को भव्य आयोजनरघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे उद्घाटनपुरूषोत्तम खेडेकर की अध्यक्षता में परिषद का शानदार

-महात्मा द्गयोतिबा फुले इतिहास अकादमी की ओर से पहली मराठा इतिहास परिषद का आगामी ८ व ९ मई को पुणे में डॉ. बाबासाहब आंबेडकर सांस्कृतिक भवन में आयोजन किया गया है.दो दिवसीय परिषद का उद्घाटन पलटण के रघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे. स्वागताध्यक्ष राहुल पोकले है. उद्घाटन सत्र इतिहास व धर्मशास्त्र के विद्वान अध्येता प्रा. अशोक राणा की अध्यक्षता में होगा. समापन सत्र की अध्यक्षता मराठा सेवा संघ के संस्थापक, अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर करव्ंगे.परिषद में शिवकालीन इतिहास लेखन, प्रणाली शास्त्र और सिध्दांत विषय पर ८ मई को एड. अनंत दाखटकर, रोहिणी कोडतकर, देवेन्द्र इंगले, तथा दूसरव् 'शिवकालीन इतिहास लेखन के विभिन्ना प्रवाह' विषय के चर्चा सत्र में प्रा. डॉ. उमेश कदम प्रा. सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर उमाले, डॉ. अनिल शिंगारव्, तीसरव् सत्र में 'शिव इतिहास व विविध माध्यम' विषय पर गंगाधर बनबरव्, मदन पाटील, इंद्रजीत सावंत, डॉ. शरणकुमार लिंबाले, और चौथे सत्र में 'शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास' विषय पर प्रा. डॉ. उमेश बगाडे विचार व्यक्त करव्ंगे.९ मई को 'शिव कर्तुत्वाचे विविध पहलू' संदर्भ में मान्यवरों के शोध-प्रपत्रों का वाचन किया जायेगा.

Monday, December 28, 2009

क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्का
के.के.एम. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. साहेब खंदारे यांच्या ‘मराठय़ांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास’ च्या पहिल्या खंडास राज्य सरकारचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश क्षीरसागर होत्या. प्रमुख पाहुणे पाथरीचे न्यायाधीश क्षीरसागर, सेलूचे न्यायाधीश भाकरे, ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव सोळंके उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव खारकर, वाघ, कांबळे, उदावंत यांचाही सत्कार करण्यात आला ,